बळवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 1957 साली त्रिस्तरीय पंचायती राज पध्दतीची शिफारस केली आणि त्यानुसार पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज पध्दतीचे शुभारंभ राजस्थानमध्ये 2 ऑक्टोबर 1959 रोजी केले.
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या कायदा, 1961 स्थापन केला आणि कायद्यानुसार 1 मे 1962 रोजी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीचा अंगिकार केला.